Breaking
ब्रेकिंग

राहुरी तालुक्यात वादळी वा-यासह अवकाळी पावसाचा तडाका…*फळबागांचे मोठे नुकसान.*…

शेतकरी  मेटाकुटीला पंचनामे तात्काळ करण्याची मागणी...

0 3 9 0 5 1

राहुरी तालुक्यात वादळी वा-यासह अवकाळी पावसाचा तडाका…फळबागांचे मोठे नुकसान

शेतकरी  मेटाकुटीला पंचनामे तात्काळ करण्याची मागणी…

राहुरी तालुका जावेद शेख

तालुक्यात गत तीन चार दिवसांपासून  वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः  थैमान घातले असून त्यामुळे हातातोंडाळी आलेला घास हिरावून नेत असल्याने  शेतकऱ्यांच्या  तोंडाचे पाणी पळाले आहेत.

आंबे,केळी,पपई,मोसंबी,डाळिंबसह उन्हाळी कांदा, बाजरी,आदी उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहेत.अवकाळी पावसाने सर्वञ दाणादाण उडाली आहे.

दरम्यान कृषीसह महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना  नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी वरवंडी ता.राहुरी येथील शेतकरी नवनाथ ढगे पा.यांनी केली.

राहुरी तालुक्यातील वरवंडी, बाभुळगाव, धामोरी, खंडांबे, सडे,बारागाव नांदुर,डिग्रस, नांदगाव , शिंगवे, देहरे,आदी परिसरात वादळी वारा व मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.त्यामुळे उन्हाळी फळासह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

वरवंडी सह परिसरात ता.23-5 पासून दररोज  आकाशात  काळेकुट्ट  ढग येऊन वादळी वाऱ्यास जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे..सोबत विजेचा  कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात होत आहे.दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस पडला. सोबत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे  अनेक भागातील वीज गुल झाली होती. या पावसाच्या फटक्यामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांच्या आंब्याच्या झाडांना लागलेल्या कैऱ्यांचा अक्षरशः  सडा पडला तसेच जनावरांचे गोठ्यांचे पञे उडाली.चाळीचे नेट जमीनदोस्त झाल्या तसेच विजेचे खांब  वाकल्या. ठिकठिकाणी झाडांच्या फाद्या तुटून पडल्या.याच बरोबर  रस्त्यांवरील खड्यात आणि सखल भागामध्ये पाणी साचले होते.सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पीके आडवी झाली. 

अनेक भागांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम चालू होते.शेतकऱ्यांच्या शेतमालाची शेत पिकांना भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची हाती आलेल्या पिकाचे व शेतमालाचे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी समस्या निर्माण झाली आहे. या धक्क्यातून शेतकरी सावरतो न सावरतो तोच शेतकरी पुढे अवकाळी अस्मानी संकट उभे आले आहे. सद्या उन्हाळ्याचे दिवस असले तरी या ऋतूमध्ये दिवसभरात उन्हाळा पहावयास मिळतो तर रात्रीच्या वेळी पावसाळा पहावयास मिळत आहे. अशा या वातावरणामध्ये या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सततच्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

 

या नैसर्गिक संकटाचा फटका आंब्यासह उन्हाळी भुंईमुग,कांदा,बाजरी जनावरांच्या चा-याला बसल्याने शेतकऱ्यांना  मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहेत. गतवर्षीच्या अवकळी पावसाच्या संकटातून बळीराजा सावरत असताना  पुन्हा एकदा अवकळी पावसाने तडाका दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी पार कोलमडून पडला आहे.सध्या आंब्यांला लागलेल्या कैऱ्या वादळी तडाक्याने  गळून पडल्या आहे तर टरबूज खरबूज काकडी खिरे  कांदा इतर उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.असह्य   उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसाने दिलासा मिळाला खरा माञ अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने मोठी दैना उडाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे