ॲड.ललिता पाटिल इंटरनॅशनल स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन “कलादर्पण” जल्लोषात संपन्न
महाभारत हे महानाट्य सादर करत विद्यार्थ्यांनी जिंकली मने
ॲड.ललिता पाटिल इंटरनॅशनल स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन “कलादर्पण” जल्लोषात संपन्न.
महाभारत हे महानाट्य सादर करत विद्यार्थ्यांनी जिंकली मने
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर : येथील ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल मध्ये ‘११ वे कलादर्पण’ स्नेहसंमेलन संपन्न झाले. प्रमुख पाहुणे पो.नि. विकास देवरे , शिवकन्या पुरस्काराने सन्मानित संस्था अध्यक्षा ॲड. ललिता पाटील, संस्थेचे सचिव प्रा. श्याम पाटील, संस्थेचे संचालक पराग पाटील,देवेश्री पाटील, डॉ.शुभांगी चव्हाण, प्राचार्य डॉ.नीरज चव्हाण, प्रकाश महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले. यानंतर प्राचार्य डॉ.नीरज चव्हाण यांनी मागील अकरा वर्षांचा व वार्षिक आढावा सादर करत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारे जिल्ह्यातील गुणवता प्रदान करणारे अग्रगण्य नामांकित स्कूल असल्याचा अभिमान व्यक्त केला आणि पालकांनी दाखवलेल्या विश्वासाहर्तेसाठी त्यांचे आभार मानले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील मॅडम यांनी शाळा निर्मितीचे खडतर अनुभव कथन करत या ११ व्या वर्षपूर्तीनिमित शाळेच्या निर्मितीचा खडतर इतिहासाला उजाळा दिला आणि कशाप्रकारे अमळनेर तालुक्यातील सीबीएसई पॅटर्नच्या पहिल्या आमच्या शाळेची निर्मिती झाली यावरही प्रकाश टाकला व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा हा एक प्रामाणिक प्रयल आम्ही केला आणि त्यामुळेच आम्ही कोणत्याही इतर शाळांशी स्पर्धा करत नसल्याचे प्रतिपादन ॲड. ललिता पाटील यांनी केले. सोबतच पालकांनी मुलांना प्रोत्साहन द्यावे, त्याच्यातील गुणांना वाव द्यावा व सर्वांना आनंदी जीवन जगण्याचा मूलमंत्र देखील आपल्या अध्यक्षीय भाषणात दिला.
यानंतर कार्यक्रमाचे प्रमूख अतिथी पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी शाळेने मिळविलेल्या यशाचे कौतुक करत अमळनेर मध्ये गुणवंत विद्यार्थी या शाळे मार्फत घडत राहो अशा सदिच्छा देत पालकांना आपल्या मुलांच्या विकासाकडे लक्ष देत त्यांचे भविष्य सुकर करावे असे आवाहन केले.यावेळी दहावी व बारावी सीबीएसई परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी तालुक्यात पहिले येत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गणेश वंदना नृत्य सादर करत केली.यानंतर विद्यार्थ्यांच्या रंगारंग नृत्याने सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवले. महाभारत महानाट्य आणि शहीद भगतसिंग यांच्यावरील सजीव नाट्यप्रयोग हे या स्नेहसंमेलनाचे सर्वांत मोठे आकर्षण होते. अतिशय सुबकरित्या अभिनय सादर करत विद्यार्थ्यांनी सर्वांची वाहवा मिळवली.
यानंतर कर्नाटकी नृत्य, राजस्थानी घुमर, गुजराती गरबा, मराठी लावणी, जोगवा, मोबाईल वापरू नये चे संदेश नृत्य पासून ते दक्षिण भारत पर्यंत सर्व भारतीय संस्कृतीला साजेसे व अनुसरून असलेले नृत्याविष्कार नर्सरी पासून ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच यावेळी महिला सक्षमीकरण चे संदेश देणारे नृत्याविष्कार सादर झाले. प्रेक्षकांमधून निघालेल्या वारकरी दिंडीने महाराष्ट्र दर्शन घडविले, महिला शिक्षिकांनी महिला सबलीकरण नृत्य सादर करत स्त्री पणाला आगळी वेगळी मानवंदना दिली. यावेळी एकापेक्षा एक अशा सरस नृत्य व नाटिकांच्या मेजवानीचा आनंद उपस्थित सर्व प्रेक्षक व पालकांनी मनमुराद घेत विद्यार्थ्यांना उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रंचालन शिक्षक विलास पाटिल व मुस्कान ढिंगराई या सोबतच विद्यार्थ्यांपैकी कल्याणी पाटील,शिफानाझ फकीर,सिद्धी मगरे,शिफानाज शेख,रिद्धी पाटील,ज्ञानेश गांगुर्डे,भाविका बोरसे,प्रियांशी पाटील,आदित्य ओझा,मयूर शिंदे,निकिता पाटील,अनुष्का पाटील यांनी देखिल आपल्या सुत्रसंचलनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक जावेद पिंजारी यांनी सर्व पालकांचे व मान्यवरांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मेहेनत घेतली.