अमळनेर येथे भव्य कुस्ती दंगलाचे आयोजन
युवकांमध्ये शरीरसहनशीलता, व्यायाम आणि आरोग्य यांची जाणीव निर्माण करणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश

अमळनेर येथे भव्य कुस्ती दंगलाचे आयोजन
युवकांमध्ये शरीरसहनशीलता, व्यायाम आणि आरोग्य यांची जाणीव निर्माण करणे हा स्पर्धेचा मुख्य उद्देश
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- नगरसेवक प्रताप आबा शिंपी, जीवन पवार, पैलवान पवन शिंपी, पैलवान सुरज शिंपी, अमोल चौधरी व सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली “जय हिंद व्यायाम शाळा” आणि “राजे शिवाजी मित्र ंमंडळ” या प्रतिष्ठित संस्थेकडून छत्रपती शिवाजी नगर, अमळनेर येथे भव्य कुस्ती दंगलाचे आयोजन करण्यात आले. या अतिशय उर्जावान आणि मनोरंजक स्पर्धेचा मुख्य उद्देश युवकांमध्ये शरीरसहनशीलता, व्यायाम आणि आरोग्य यांची जाणीव निर्माण करणे हा होता.कुस्तीच्या आरंभी गदा आणि प्रथम बक्षीस 11 हजार रुपयांचे मानकरी ऋतिक राजपूत धुळे यांनी पटकावून विजय स्वीकरणाचे दिमाखदार प्रदर्शन सादर केले. उपविजेता म्हणून विपुल जावळकर पाचोरा यांनी आपली क्रीडा कौशल्य दाखवून बक्षीस पटकावले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बबलू पाटील, मधु चौधरी, गिरीश पाटील, पवन चौधरी, सुनील पाटील, दीपक चौधरी आणि पैलवान भोमेश यांच्या योगदानाने नाष्टा, जेवण व पाण्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली. पंच मंडळी म्हणून पैलवान रावसाहेब, पैलवान विनोद, पैलवान संजय आणि पैलवान विठ्ठल यांनी कुस्ती दंगलाच्या सर्व कार्यक्रमाची अचूक यथासमय देखरेख केली. सूत्रसंचालनाचे कार्य प्रवीण पाटील व अरुण पाटील यांनी पार पाडले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंगळग्रह मंदिर अध्यक्ष डॉ.दिगंबर महाले सर, संदीप जोशी, डॉ. हजारे, उद्योगपती विनोद भैय्या पाटील, डी.वाय.एस.पी अमळनेर, धुळे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, चेतन सोनार, बिल्डर प्रशांत निकम उपस्थित होते.मनोगत- आयोजकांनी केवळ क्रीडाप्रेमींना नवचैतन्य देण्यापुरते थांबून राहिले नाहीत; तर त्यांनी युवकांमध्ये आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती व व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा अमूल्य संदेशही दिला. भविष्यात अशाच प्रकारच्या स्पर्धांद्वारे अनेक मल्ल तयार होती, नियमितपणे या उपक्रमाची पुनरावृत्ती करून समाजात शारीरिक प्रशिक्षणाचे महत्त्व वाढवण्याची नम्र अपेक्षा व्यक्त केली, एकंदरीत, हा कुस्ती दंगल एक यशस्वी नमुना सिद्ध झाला असून त्यात सहभाग घेणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि आरोग्याबद्दलची जागरूकता वाढली आहे. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये शारीरिक क्षमता व क्रीडाप्रेमाला नवचैतन्य प्राप्त होईल, असे मनोगत या प्रसंगी व्यक्त केले..!
*अनिल भाईदास पाटील*
*मा.मंत्री (मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन) महाराष्ट्र राज्य*
*आमदार- अमळनेर विधानसभा मतदारसंघ