Breaking
ब्रेकिंग

पातोंडा आणि मारवड या ठिकाणी शहिद वीरांचे शौर्यस्मारक उभारण्यात येणार

0 3 9 0 6 1

पातोंडा आणि मारवड या ठिकाणी शहिद वीरांचे शौर्यस्मारक उभारण्यात येणार

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर : शहीद जवानांच्या आठवणी कायमस्वरूपी रहाव्यात म्हणून जळगाव जिल्ह्यात २८ त्यात अमळनेर तालुक्यात अमळनेर ,पातोंडा आणि मारवड या ठिकाणी शहिद वीरांचे शौर्यस्मारक उभारण्त येणार आहे. १९६५ पासून झालेल्या विविध लष्करी युद्धात लढताना आपले प्राण गमावलेल्या शहीद जवानांचे त्यांच्या गावी स्मारक उभारून जनतेच्या मनात राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण केली जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजनेच्या नावीन्यपूर्ण योजनेंतरंगत प्रत्येकी २५ लाख रुपये खर्च करून ही स्मारके उभारली जातील. यासाठी शासकीय जागा उपलब्ध केल्या जाणार आहेत. जिल्हा सैनिक कल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील २८ शहीद वीरांची नावे प्राप्त झाली आहेत. अमळनेर तालुक्यातील अमळनेर , पातोंडा आणि मारवड या तीन ठिकाणी ही शौर्यस्मारके उभारली जातील.ही स्मारके वीरांच्या शौर्याची साक्ष देत दिमाखाने उभी राहून गावाचा अभिमान उंचावणार आहेत. नव्या पिढीला देशभक्ती ,राष्ट्रप्रेमाची स्फुर्ती देणारे ठरतील- आयुष प्रसाद ,जिल्हाधिकारी जळगाव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे