सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान तर्फे महिलांच्या जुन्या साड्या पासुन विशेष उपक्रम
सुमारे ५ हजार पिशव्या तयार करुन समाजात जनजागृती केली

सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान तर्फे महिलांच्या जुन्या साड्या पासुन विशेष उपक्रम
सुमारे ५ हजार पिशव्या तयार करुन समाजात जनजागृती केली
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर : सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान च्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त भाजी बाजारात व्यापाऱ्यांना ५ हजार कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या.पर्यावरण संवर्धन करण्यासाठी प्लास्टिक पिशव्या , कॅरी बॅग याना बंदी घातलेली असताना देखील सर्रास प्लास्टिक पिशव्या वापरल्या जातात आणि दुकानदार , भाजीपाला फळ विक्रेते प्लास्टिक पिशव्या विक्री करतात. यावर जनजागृती व्हावी म्हणून सानेगुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान तर्फे महिलांच्या जुन्या साड्या गोळा करून त्याच्या सुमारे ५ हजार पिशव्या तयार करण्यात आल्या. ५ जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त भाजीपाला बाजारात तसेच किरकोळ विक्रेत्यांना या पिशव्या वाटप करण्यात आल्या. त्याचप्रमाणे नागरिकांनी पातळ पदार्थ ,दूध , हॉटेल मधील भाज्या ,जेवण यासाठी डब्यांचा वापर करून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन करण्यात आले. जुन्या झालेल्या साड्या , कापडे फेकून देण्यापेक्षा त्याच्या पिशव्या बनवून वापरल्या तर प्लास्टिक बंदी होऊन पर्यावरण संवर्धन होऊ शकते असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी स्मारक कार्यवाह दर्शना पवार , चेतन सोनार ,खा. शि मंडळ संचालक प्रदीप अग्रवाल , माजी नगरसेवक श्याम पाटील नाना धनगर ,लोकेश वाणी , शिव निकम , श्याम पाटील , उदय पाटील, चौधरी , शोएब , जावेदा , अख्तर , भारती महाजन , सुरेश महाजन हजर होते. दरम्यान हा उपक्रम वर्षभर राबवण्यात येत असून घरगुती वापरातील जुन्या साड्या जमा करण्याचे आवाहन देखील दर्शना पवार यांनी केले आहे.