अमळनेर शहराची पाणी वितरण यंत्रणा सुधरवा न.पा.चा लवकरच आढावा घेणार-आ. अनिल दादा

अमळनेर शहराची पाणी वितरण यंत्रणा सुधरवा न.पा.चा लवकरच आढावा घेणार-आ. अनिल दादा
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर शहरातील पाणीपुरवठा वितरण काही प्रमाणात विस्कळीत होवून नागरिकांची गैरसोय होत असल्याने तातडीने याचे योग्य नियोजन करुन पाणीपुरवठा नियमित करा याबाबत सक्त सूचना आ.अनिल दादांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर
यांना दिल्या आहेत.लवकरच केलेल्या नियोजनाचा आणि पाणीपुरवठा विभागाचा आढावा आपण स्वतः घेणार असल्याचेही आ. पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान शहरात सध्या नागरिकांना पाच ते सहा दिवसानंतर पाणी मिळते आणि त्यातही अनेकदा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. विशेष म्हणजे पाणी वितरण कंत्राटी पद्धतीने केले जात आहे. त्यांत नियोजनाचा अभाव असल्याची ओरड नागरिकांत होत आहे. तापी नदीत पाणी उपलब्ध असूनही कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने नागरिकांची नाराजी ओढवत आहे. सध्या लग्न सराई सुरु असल्याने घरोघरी पाहुणे मंडळी आलेली आहे तसेच संत सखाराम महाराजांचा यात्रोत्सवदेखील अक्षय तृतीयेपासून येत आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन तातडीने सुधरविणे गरजेचे आहे. विशेष करुन तांबेपूरा, पैलाड, शिरुड नाका, मुंदडा नगर सह अन्य कॉलनी भागांत पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढल्याने आलेल्या तक्रारी नुसार आ. अनिल दादांनी तातडीने याची दखल घेत स्वतः लक्ष घातले असून कोणत्याही परिस्थितीत नियोजनात सुधारणा करुन नागरिकांचे हाल थांबवा अशा सूचना त्यांनी पालिका प्रशासनास दिल्या आहेत.