Breaking
ब्रेकिंग

माती व पाणी परीक्षणानंतरच पेरणी करावी – मा. आमदार उमेशजी यावलकर (वरुड विधानसभा क्षेत्र )

0 3 9 0 4 8

माती व पाणी परीक्षणानंतरच पेरणी करावी –
मा. आमदार उमेशजी यावलकर
(वरुड विधानसभा क्षेत्र )

राहुरी वृत्तसेवा / जावेद शेख

भारत सरकार उपक्रम व महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर विकास संस्था काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने वरुड जिल्हा अमरावती येथे एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर जाणीव जागृती शेतकरी मेळावा घेण्यात आला. उद्घाटक मा. उमेश यावलकर (आमदार वरुड विधानसभा क्षेत्र) यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च जास्त व उत्पन्न कमी या विवंनचेवर मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितले कोणतेही पिक घेण्याआधी त्यासाठी लागणारा जमिनीचा दर्जा व पाण्याची गुणवत्ता तपासून जर पेरणी केली तर अपेक्षेत उत्पादन घेवू शकेल.शासकीय यंत्रणे सोबतच खाजगी संस्था/कंपनी यांनी सुद्धा गुणवत्ते नुसार योग्य तपासणी करून शेतकऱ्यांना मदत करावी असे आव्हान त्यांनी केले .

या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष रोहित कुमार (हिल इंडिया दिल्ली ) उद्घाटक मा. उमेश यावलकर (आ. वरुड विधानसभा क्षेत्र ) , प्रमुख अतीथी विजय कुमार (भोपाल) , अशोक वंजारी (भोपाल) कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. सतीश ढोके (सचिव म.शे.शे.विकास संस्था ) तर प्रमुख उपस्थितीमध्ये मनोज चौधरी (हिल इंडिया अहमदाबाद ) , चंद्रकांत मिस्त्री(हिल इंडिया महाराष्ट) , श्री रेहान मोजावर(ता.कृ. अ. वरुड) , रमेश येवले यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.देवयानी लोखंडे (कार्यकारी अधिकारी म.शे.शेविकास संस्था) कार्यक्रमाला यशस्वी करण्याची संस्थेच्या कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न केले या कार्यक्रमात 584 शेतकरी उपस्थित होते.त्यांचे आभार डॉ.कैलाश कडू सरांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे