मित्राचा जीव वाचवताना स्वतःचं आयुष्य पणाला लावलं

मित्राचा जीव वाचवताना स्वतःचं आयुष्य पणाला लावलं
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- धुळे अवधान धरणावर काल जे घडलं, त्याने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. मैत्री, निस्वार्थता आणि त्यागाचं असं उदाहरण फारच क्वचित पाहायला मिळतं इन्साफ खान या 22 वर्षीय तरुणाने आपल्या मित्राचा जीव वाचवताना स्वतःचं आयुष्य पणाला लावलं.इन्साफ खान धुळे येथील SVKM कॉलेजमध्ये B.Pharmacyच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. तो मूळचा अमळनेरचा असून, Mundada Builders मध्ये जेसीबी ठेकेदार म्हणून कार्यरत असलेल्या आजाद खान यांचा एकुलता एक मुलगा होता. शांत, अभ्यासू, कष्टाळू आणि सर्वांचा लाडका असलेला इन्साफ… काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. घरात आनंदाचं वातावरण होतं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं.काल, तो आपल्या मित्रांसह अवधान धरणावर फिरायला गेला असताना, मयूर गांगुर्डे या मित्राचा अचानक तोल गेला. क्षणाचाही विचार न करता, इन्साफ त्याच्या मदतीला धावून गेला. मयूरला वाचवण्यात तो यशस्वी ठरला, पण त्याच क्षणी त्याने स्वतःचा शेवटचा श्वास घेतला.आज संपूर्ण अमळनेर आणि धुळे परिसर त्याच्या जाण्याने हळहळतोय.